आपली हक्काची माणस मनापासून जपा

आपण आपल्या काळाच्या ओघात वाहत असतो,आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे लागलेलो असतो....आणि अश्या वेळी ,आयुष्यात कधी कोणावर कश्या पध्दतीने आघात होऊ शकतात ,
कोणाला कोणत्या आणि कश्या अवघड प्रसंगातून जावं लागेल काही, काहीच सांगता येत नाही.….
आयुष्य खूपच अनिश्चित आहे......
पण त्यातून बाहेर पडायला..
आपण खचलेलो असताना,आपलं मन हरलं तरी योग्य दिशेला घेऊन जाणारी एखादी हक्काची व्यक्ती हवीच....!!
जी आपला त्यावेळी आधार ही बनते आणि मार्गदर्शकही बनू शकते .नव्याने उभारण्याची मनात जिद्द निर्माण करते....
आणि त्या व्यक्तीमुळे का असेना,आपल्याला  जगण्याची ,आयुष्य सावरून पुन्हा उभारण्याची ओढ मनात निर्माण झाली की,
भूतकाळात घडलेल्या कटू गोष्टीवर पडता पडून पुन्हा जोमाने कामाला लागून सकारात्म जगता येते.

म्हणूनच काहीही झालं तरी 
"आपली हक्काची माणस मनापासून जपा"
आयुष्यात तीच उपयोगाला येतात.
©सोनाली कुलकर्णी

0 comments: