आपली हक्काची माणसं जपायला शिकायलाच हवं!!

#हक्काचीमाणसं

एखादी वस्तू असो वा नातं असो
ते टिकण आणि टिकवण आपल्याच हातात असत फक्त फरक इतकाच असतो
वस्तू टिकल्या नाहीत तर हव्या तश्या पुन्हा घेऊ शकतो
पण नात टिकवता नाही आलं तर आख्या आयुष्यावर परिमाण होतो....मनस्थिती बिघडू शकते...आणि मग
नाती तकलादू होऊन कायमची तुटतात ....
म्हणूनच राग ,द्वेष ,मनात सलणार्या गोष्ठी,आपल्या स्वतंत्र prorities,आपली महत्वकांक्षा ,आपला इगो किती ताणून धरायच्या त्यांना किती महत्व द्यायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे.
त्याच बरोबर ,चेष्टा मस्करीही कोणत्या लिमिटपर्यन्त करायची हेही कळलं पाहिजे...नाहीतर मस्करीत कुस्कुरी होते.....
कारण नाती तोडणं सोपं असतं पण त्यांना जोडून ठेवण ,आपल्या तत्वाशी तडजोड करून पुढच्या व्यक्तीचा विचार करणं अवघड असते.
आणि कोणतंही आपल्याला हवं असणार नातं टिकवायला हे जमायलाच हवं.
आणि सगळ्यात महत्वाचे आपलं नात का होत ?
आणि कश्यासाठी होत याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे....म्हणजे त्या नात्याचा एकदा अर्थ उमजला की नातं आयुष्यभर कायमस्वरूपी टिकत.
म्हणूनच आपली हक्काची माणसं जपायला शिकायलाच हवं!!
©सोनाली कुलकर्णी

0 comments: