चिरमुरे आणि आजीची आठवण

गावाकडे मापट्यावर , पायलीच्या मापाने ,मोठ पोत भरून चिरमुरे विकायला दर आठवड्यातून एकदा सायकल वरून माणूस यायचा.
चिरमुरे, चिरमुरे करत तो माणूस गावभर  फिरायचा.....
अख्खा गावातून एक वेढा मारला तरी त्याच भल मोठ आणलेले चिरमुर्याचे पोत संपून जायचं.....
लोकांना त्याची सवय झाल्यावर त्याचा वार पण ठरवला गेला होता... लोक एक आठवड्याच्या हिशोबाने चिरमुरे घेऊन ठेवायचे आणि पुढच्या आठवड्यात तो परत येईल याची वाट पाहायचे..
तसा ...इकडे तिकडे जरा मोठ असलेल्या गावात आठवडी बाजार भरायचा त्या गावात पण चिरमुरे वाले असायचे...
पण....
हा असा चिरमुरे विकायला घेऊन येणारा माणूस सोईस्कर वाटायचा.नवीन नवीन ताजे ताजे भट्टीतून काढलेले चिरमुरे खायला मजा यायची.
लहान असताना आजी ,बाबा नेहमी असे चिरमुरे घ्यायचे...
भेळ हा प्रकार फारसा बनवला नाही जायचा.....
एकतर लसूण घालून केलेलं भडंग  किंवा मग.... 
पांढऱ्या चिरमुर्यावर तिखट , मीठ ,मेतकूट,तेल घालून हाताने एकसारखे केलेले चिरमुरे..आजी बनवायची..
त्यात हवे तर कांदा ,टोमॅटो , कोथिंबीर घालायची कधीतरी...
पण...
असेच....नुसते तिखट मीठ मेतकूट तेल घालून लावलेले चिरमुरे पण भारी लागायचे...
आपल्या महाराष्ट्रात मिळणारे चिरमुरे मस्त टपोरी ,कुरकुरीत मिळतात.जो सांगली किंवा कोल्हापुरी भेळ साठी वापरला जातो.

गेले 5 वर्ष झाले Bangalore मध्ये राहते....तसे चिरमुरे इकडे मिळत नाही आणि पाहिजेच असेल तर खूप शोधावं लागत.
आज घरात चिरमुरे होते पण आपल्याकडे मिळतात तसे नसले तरी...
आजी जाऊन अनेक वर्ष झाली आहेत पण आज चिरमुरे पाहून खूप जास्त आजीची आठवण आली... 
म्हणून...मग...
तिच्या आठवणीत थोडंस विसावून, तिच्यासोबतच बालपण आठवत...
मस्त तिखट मीठ मेतकूट तेल घालून चिरमुरे लावले !
आणि त्याचाच आस्वाद आठवणीना पुन्हा एकदा उजाळा दिला.

खरतरं आजी म्हणजे आठवणीचा खजिना....आणि मायेचा हळवा प्रेमाचा साठा..कधीही न संपणारा...
@सोनाली कुलकर्णी 

#आजीची_आठवण #गावाकडच्या_गोष्ठी

0 comments: