जेव्हा तुम्ही कोणासाठी गरजेचे असता, तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत फक्त नुसती गरजेपोटी कधीच नसते.
तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनता,
तुम्ही त्यांच्या आनंदात, दु:खात, यशात आणि अपयशात त्यांच्यासोबत कायम राहता . तुमचं अस्तित्व , तुमचं असणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण तुमचा त्यांना मानसिक आणि भावनिक आधार वाटतो. तुमच्यासोबत असताना त्यांना सुरक्षित वाटतं.
पण जर तुम्ही फक्त समोरच्याची एक गरज असाल, तर तुमचं अस्तित्व एका ठराविक हेतूसाठी किंवा फायद्यासाठीच असतं.
तुमचा वापर फक्त तात्पुरत्या गरजेसाठी केला जातो आणि जेव्हा ती गरज पूर्ण होते, तेव्हा तुमची किंमत कमी होते. अशा नात्यात भावनिक हा भागच नसतो. हे नातं फक्त स्वार्थावर आधारित असत, जिथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा फक्त फायदा घेते.
अशा नात्यांमध्ये नेहमीच असुरक्षितता वाटू लागते आणि भावनांचाशून्य नात जाणवू लागत.
गरजेच असण आणि गरज असण या दोन्हीमधील फरक ओळखणं खरंच खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एका व्यक्तीसोबत फक्त गरज म्हणून जोडलेले असाल, तर ते नाते जास्त काळ टिकत नाही मग ते नाते कोणतेही असो . अशा नात्यांमध्ये तुम्हाला कधीच खरे प्रेम आणि आदर मिळत नाही. म्हणूनच, आपण आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या नात्यांना जास्त महत्त्व देतो , हे ठरवण्यासाठी हा फरक ओळखणं खरंच महत्त्वाचं आहे. खालील फोटोमधील हा qoute मला खरंच मनोमनी पटला..म्हणूनच...हे सारं लिहिण्याचा.. प्रयत्न...
@सोनाली कुलकर्णी
#relationships #follower #fbpost2025シ #lifelessons #spandankavitaa
0 comments: