गोड बोलणारी लोक जास्त आपली का वाटतात??

हल्ली लोकांना "गोड बोलणारे" लोक जास्त आवडतात. कारण गोड बोलण्यात गोडवा आहे, आपुलकी आहे, समोरच्या माणसाला आनंद देणारा एक हलकासा स्पर्श आहे. 
पण "खरे बोलणारे" लोक बहुतेक वेळा टाळले जातात ,नको वाटतात. कारण खरं बोलणं म्हणजे सत्य मांडणं, आणि सत्य हे नेहमीच कडू असत .

गोड बोलणारे लोक आपल्याला हसवतात, वर वर का होईना कौतुक करतात, आपण जे करतो त्याला बिनधास्त पाठिंबा देतात. खूपदा त्यांच्यासोबत राहिलं की अहंकार सुखावतो, मनाला समाधान मिळतं. पण खरे बोलणारे लोक आरसा दाखवतात. आपल्यातल्या चुका, कमतरता, चुकीचे निर्णय हे ते स्पष्टपणे सांगतात. म्हणून त्यांचं बोलणं टोचतं, कडवट वाटतं,नकोस वाटत.

खरं म्हणजे प्रत्येकाला दोन्ही प्रकारचे लोक हवे असतात. गोड बोलणारे लोक आपल्याला आत्मविश्वास देतात, आणि खरे बोलणारे लोक आपल्याला घडवतात. पण दुर्दैवाने आज लोक "सत्य" स्वीकारायला तयार नाहीत. सत्याला भिडण्याची हिंमत कमी झाली आहे. म्हणूनच "गोड बोलणाऱ्यांची" गर्दी आयुष्यात जास्त करून घेतात, आणि मनापासून "खरे बोलणारे" एकटे पडतात.

मात्र आयुष्य खरंच बदलवणारे, प्रगतीच्या मार्गावर नेणारे हे गोड बोलणारे नसतात, तर खरे बोलणारेच असतात ,ज्यांना खरंच तुमच्या बद्दल काळजी असते ,त्यांना तुमचं खरंच चांगल झालेलं पाहायचं असत. तुम्ही चुकत असाल तर ते आपल्याला टोकतात , ते तुमच्याबाबतीत परखड मत व्यक्त करतात.वेळेअगोदर सावध करण्याचा प्रयत्न करतात.जरी ते शब्द कडू वाटले तरी आपल्याला सत्य दाखवतात, चुका लक्षात आणून देतात, योग्य मार्ग दाखवतात.

लोकांना बहुतेकदा आपल्या भावनांना सुखावणारे शब्द हवे असतात, म्हणून ते गोड बोलणाऱ्यांना जवळ करतात.
पण आपल्या चुका दाखवणारे सत्य मनाला टोचतं, म्हणून खरे बोलणाऱ्यांना दूर ठेवतात.
खरं तर गोड बोलणं तात्पुरता आनंद देतं,
आणि खरं बोलणं आयुष्य बदलून टाकतं.

म्हणूनच, ज्यांच्याकडून आपल्याला खरं बोलून ऐकावं लागतं, त्यांना दूर न ढकलता, त्यांचा सन्मान करायला शिकायला हवं. कारण खरे बोलणारे लोक हे आपल्याला हवे असतात जरी त्या क्षणी ते नकोसे वाटले तरीही आपले चुकते पाऊल सावरण्यासाठी...!!
@सोनाली कुलकर्णी 

#lifelessons #relationship #follwers #highlights #fbpost2025シ #अनुभवाचेबोल