सप्तपदी घेऊन अग्निच्या साक्षीने..ज्या नात्यात घट्ट बांधले जातो...ते सुंदर नात....लग्नाच...नवरा बायकोच!
लग्न करणं खुप सोपी गोष्ट आहे....पण ती टिकवणं..फुलवणं..त्याला छान बहर येऊन देणं ही दोघांची जबाबदारी आहे...
लग्नाआधी.....स्वतंत्र असलेले दोघ एका नात्यात बांधले गेले कि.....सुरू होतो तो...अगदी सोपा नाही आणि खुप अवघड पण नाही असा संसाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रवास...
त्यात दोघांनाही कष्ट करण्याची ताकद,सहनशिलता,सजुदारपणा..तडतोड याची मानसिकता ठेवावीच लागते....कारण म्हणतात ना
"नवरा बायको दोन चाक असतात.."
एक बंद पडून किंवा नाराज असून चालतच नाही ..समतोल कायम रहाणे खूप गरजेच आहे.....
आजकाल दोघांनी नोकरी करणं गरजेच आहे.....
दोघांचीपण घर ,मुल,नातेवाईक,नोकरी तारेवरची कसरत सुरु असते...प्रत्येकवेळा पैशाची जुळवाजुळव करणे ,
होमलोनच टेंन्शन,अचानक येणारी आजारण,वयस्कर आई-वडील,मुलांची स्कुल फी.....पाळणाघर...होम मेटेंनन्स ...बापरे बाप सगळा पैशांचा खेळ.....
आणि ह्या तर सगळ्याच गोष्टींची सगळ्यांना सोय करावीच लागते...पण हे सगळं करत असताना....
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहुन जाते..."जगणं",
कुंटुंबाला वेळ देण....
...हम्म ह्या सगळ्याच गोष्टींचा नाईलाज आहे..कराव्या तर लागणारच.....पण तरीही....
ती सल प्रत्येकाच्या मनात राहुनच जाते...
सगळे आपआपल्यापरीने जगतात...आणि
स्वताःलाच असच असत आयुष्य असे समजवत रहातात....
आणि हो हे केल्याशिवाय हा संसाराचा गाढा पुढे ओढलाही जाणार नाही ना....
असच जगायचं...जसा प्रवाह येईल तस...
पण जमेल तेव्हा ,
एकमेंकाना वेळ देऊन,प्रेमाने,आपुलकीने,नात्यातला ओलावा कायम टिकवून,आपण एकमेंकाचे भक्कम आधारच आहोत..आणि शेवटच्या श्वासापर्यंत एक आहोत ही मनात भावना ठेवूनच.
आणि ही दोघांनी एकमेंकाना जाणिव करुन देऊन....शब्द,स्पर्श,डोळे...सगळयाच्या माध्यमातुन.....मग हे प्रेमळ नातं खरच खूप बहरेल,रातराणीच्या सुवासाप्रमाणे चौफेर दरवळेल....आणि त्याचा आंनद अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकेल....!!
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
#followers #marriedcouple
0 comments: