ह्या दिवाळीत स्वतःसाठीही जग...❤️

#प्रत्येक_मैत्रिणीसाठी 
दिवाळी आली की घर प्रकाशमान होतं, पण सर्वात आधी उजळते तीची धावपळ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरची साफसफाई, खरेदी, स्वयंपाक, फराळ, सजावट… गडबड सुरू होते.
दिवाळीत घर कसे आनंदाने उजळून निघायला हव हाच विचार तिच्या क्षणोक्षणी मनात पिंगा घालत असतो..

घर आनंदाने झळाळून जावं म्हणून ती क्षणोक्षणी झटत असते.
सगळ्यांच्या आनंदाची काळजी घेताना ती स्वतःचा थकवा विसरते.
पण या झगमगाटात ती एक गोष्ट विसरते ,
"प्रकाश फक्त घरात नाही, तो तिच्यातही आहे."

दिवाळीचा अर्थ फक्त फराळ, सजावट, आणि पाहुणचार नाही
तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणं आहेच पण त्याचबरोबर स्वतःच्या चेहऱ्यावरही आनंदाचा दरवळ दिसायला हवा...
सगळ करण्याच्या नादात.... स्वतः कडेही लक्ष द्यायला हवं...
स्वतःला सांगायला हवं....

ऐक ना,
सगळं परफेक्ट नसलं तरी हरकत नाही,
एखादं काम पुढं मागं झालं तरी चालेल,
एखादा दिवा विझला तरी तू आहेस ना,
पुन्हा उजळवण्यासाठी, पुन्हा लावण्यासाठी.

घराचा दरवळ सुगंधी असतो तेव्हा मनाचं वातावरणही प्रसन्न असेल…म्हणून मनातले ओझे, चिंता, अपेक्षा थोड्या वेळासाठी बाजूला ठेव.
या दिवाळीत, सगळ्यांना आनंद दे, आणि स्वतःलाही घे .

कारण, तुझ्यातला प्रकाशच हा घराचं खऱ्या अर्थाने तेज आहे.
आणि तो प्रकाश…तुझ्या मनातला, तुझ्या हास्यातला, तुझ्या थकलेल्या पण समाधानी नजरेतला कधीच मंद होऊ देऊ नकोस! 🪔💛

या दिवाळीत, फक्त घर नाही,
तर स्वतःचं अस्तित्वही उजळव.
आणि थोडं स्वतःसाठीही जग. ♥️
Facebook @सोनाली कुलकर्णी 

#दिवाळी #प्रकाश #स्वतःसाठीथोडं #CelebratingHerLight #DiwaliMagic #InnerGlow #followers #highlight #highlightseveryone
Blue Ticks...

हल्ली दोन निळ्या रेषांनी ठरतो आता नात्यांतील ignorance,
"Seen" झालेला msg आणि त्याचा न आलेला रिप्लायच सांगून जातो सर्वकाही... 💙💔
Fb @सोनाली कुलकर्णी instagram @Spandankavitaa 

#bluetick #feelings #silentlove #marathipoetry #émotions
#trendingreels #trending #trendingsongs #viralreels #poemoftheday #poem #love #nanobanana #prompt #viral #explore #fyp #foryou #reels #ᴛʀᴇɴᴅɪɴɢɴᴏᴡ #̤r̤e̤e̤l̤s̤t̤r̤e̤n̤d̤i̤n̤g̤ #reelchallenge #viralcontent #instachallenge #instagood
आपलं कुणीतरी...

जगाच्या गर्दीत आपण लाखो लोकांपैकी एक असतो.
आपल्या येण्या-जाण्याने, वेळेवर पोहोचण्याने जगाचा घड्याळाचा काटा थांबत नाही.
पण जेव्हा आपल्या आयुष्यात “आपलं कुणीतरी” असतं, तेव्हा सगळं बदलून जातं.

ते आपल्या प्रत्येक क्षणाला अर्थ देतात 
आपण वेळेवर पोहोचलो, तर त्यांना दिलासा मिळतो;
उशीर झाला, तर त्यांना काळजी वाटते.
आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून, बोलण्यातून, नजरेतून त्यांना आपले अस्तित्व जाणवतं.

हेच खरं “महत्त्व” आहे जे एखाद पद, पैसा प्रतिष्ठा , प्रसिद्धी देत नाही, ते सारे काही क्षणिक असत पण एखाद्याच्या हृदयातल्या मिळालेल्या जागेतून ते आपल्याला ते महत्व मिळत...

जगासाठी आपण एक चेहरा असू,
पण त्या व्यक्तीसाठी आपण भावना, शांतता ,प्रेम. आधार आणि घर असतो.
त्यांचं “तू आलास/आलीस का?” " आज उशीर होणारे का??"
 हे विचारणं, आपल्या अस्तित्वाला अर्थ देतं.

कधी कधी, आयुष्याचं खरं समाधान असतं कोणीतरी आपल्या येण्याची वाट बघतंय..♥️
@सोनाली कुलकर्णी | स्पंदनकविता 
Follow me on Instagram @spansankavitaa 


#followers #highlight #marathistatus #मराठीलेख #fbviralpost2025シ #fbpost #स्पंदनकविता
सांजवेळ....

सांजवेळ....🧡
हा सूर्य, जेव्हा क्षितिजावर आपले तेज हळूहळू कमी करत मावळायला लागतो, तेव्हा तो फक्त दिवस संपल्याची सूचना देत नाही, तर तो मला तुझी खूप आठवण करून देतो.
आकाशात पसरलेली ती केशरी-लाल सांज, तुझा चेहरा डोळ्यासमोर उभी करते. त्याची शांतता आणि हळुवारपणा सांगतो की दिवसभरचा प्रवास संपला आहे, आता फक्त आठवणीत रमण्याची वेळ आहे.
प्रत्येक मावळणारी किरण जणू काही आपल्या एकत्र घालवलेल्या क्षणांची साक्ष देत असते. जसजसा सूर्य दूर जात अंधार दाटतो, तसतसं तू माझ्या जवळ असावस अशी ओढ अधिकच वाढू लागते.

हा सूर्यास्त कितीही सुंदर असला, तरी तुझ्या असण्याची जागा तो कधीच भरू शकत नाही.
@सोनाली कुलकर्णी 
PC : me😍 #justclick 
 
#सांजवेळ #आठवण #प्रेम #longdistance #explorepage #followers #follower #highlight #marathipost #everyonefollowers

Visit my Blog for more Articles
www.spandankavitaa.com
coffee आणि ते दोघे

खिडकीबाहेर पाऊस सुरू झाला आणि त्या क्षणी त्याला वाटलं, की हा पाऊस त्यांच्या दोघांसाठीच बरसत आहे.😍
त्याने दोन कप कॉफी आणली. एक तिच्यासमोर ठेवली. 
तिने कप हातात घेतला, 
पण तिचं लक्ष कॉफीपेक्षा त्याच्या ’डोळ्यांकडेच’ होतं.
त्याने तिच्या नजरेला नजर देऊन तो हळूच म्हणाला, 
"तुला माहितेय का, तुझ्या हास्याशिवाय ही कॉफीही फिकीच वाटते," 

तिच्या डोळ्यांत ह्या एका वाक्यानेच एक चमक आली. 
तिने काहीच उत्तर दिलं नाही, 
पण तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य सगळं काही सांगून गेलं. कॉफीच्या वाफेचा हलका पडदा त्यांच्यामध्ये होता, पण त्यांच्या नजरेतून त्यांचं प्रेम एकमेकांशी बोलत होतं. 

तो क्षण फक्त कॉफी पिण्याचा नव्हता,
तर प्रेमाच्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद घेण्याचा होता.

त्याला जाणवलं ,
ही सकाळ म्हणजे कॉफीसारखीच आहे… थोडीशी गोड, थोडीशी कडवट, पण तिच्याशिवाय अपुरी.

कॉफीचा प्रत्येक घोट त्यांच्या नात्याला अजून घट्ट करत होता.
आणि दोघांनाही उमगलं ,
"प्रेम म्हणजे फक्त बोलणं किंवा एकत्र असणं नाही,
तर अशा शांत क्षणांत एकमेकांच्या अस्तित्वाचा अनुभव घेणं आहे."♥️

सर्वांना  International Coffee Day ☕💕च्या  शुभेच्छा!
@सोनाली कुलकर्णी 

#hilights #follower #आयुष्य #fbpost #coffeeday  #प्रेम #लघुकथा
जीवनाचे घड्याळ

जीवनाचे घड्याळ... नुसतं घड्याळ नाही, तर ते आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक सुंदर प्रवास. प्रत्येक अंक फक्त वेळ दाखवत नाही, तर जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण करून देतो.
१ - जन्म: हा प्रवास सुरू होतो, जेव्हा आपण या जगात येतो. एक निरागस, नवीन सुरुवात.
२ - बालपण: हा काळ म्हणजे खेळ आणि निरागसता. चिंता-मुक्त आणि आनंदाचा काळ, जिथे प्रत्येक दिवस एक नवीन शोध असतो.
३ - खेळ: बालपणातला हा महत्त्वाचा भाग. खेळ आपल्याला जगायला शिकवतात, टीमवर्क आणि हार-जीत स्वीकारायला शिकवतात.
४ - स्वप्नं: हळूहळू आपण मोठं होतो, आणि डोळ्यासमोर येतात अनेक स्वप्नं. काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि आकांक्षांचा टप्पा.
५ - प्रवास: आता खरी धावपळ सुरू होते. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास, जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला पुढे घेऊन जातं.
६ - प्रेम: आयुष्याला एक वेगळीच उब मिळते. नात्यांना, भावनांना एक अर्थ प्राप्त होतो आणि आपण एकटे नाही हे जाणवतं.
७ - संघर्ष: आयुष्य आपली परीक्षा घेतं, अडथळे येतात. हाच काळ असतो, जिथे आपण आतून अधिक मजबूत आणि कणखर बनतो.
८ - यश: मेहनतीचं फळ मिळतं आणि स्वप्नं प्रत्यक्षात उतरतात. हा क्षण आपल्याला आपल्या प्रयत्नांची जाणीव करून देतो.
९ - शांतता: या टप्प्यावर मनाला समाधान मिळतं. आयुष्याचा खरा अर्थ समजून येतो, आणि आपण शांततेने प्रत्येक क्षण अनुभवतो.
१० - आठवणी: आयुष्याच्या या टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो. जगलेल्या क्षणांची, अनुभवलेल्या आठवणींची उजळणी करतो.
११ - म्हातारपण: शरीर थकून गेलेलं असलं, तरी मनातील अनुभवाचा साठा अमूल्य असतो. हा काळ असतो जुन्या आठवणींमध्ये रमण्याचा आणि आयुष्याकडे कृतज्ञतेने पाहण्याचा.
१२ - शेवट: जीवनाची सांगता.

हे घड्याळ आपल्याला हेच सांगतं की, जीवनातील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. बालपणाची निरागसता असो, तारुण्याचा संघर्ष असो, यशाचा आनंद असो, किंवा म्हातारपणातली शांतता असो... या सगळ्यांतूनच आयुष्य पूर्ण होतं.

"एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे त्याची नवी सुरुवात…"
ही ओळ आपल्याला जीवनाची क्षणभंगुरता आणि त्याचवेळी प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगण्याची आठवण करून देते.
 मृत्यू हा सुद्धा शेवट नसून, एका नवीन प्रवासाची सुरुवात असते.

सहज नजरेत आलेला हा फोटो खूप आवडला आणि जगण्याकडे positive दृष्टिकोन बनवण्यासाठीच हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.....
!!श्री स्वामी समर्थ!!
@सोनाली कुलकर्णी 

लेख आवडला तर नक्की शेअर करावा आणि नवीन लेख वाचण्यासाठी follow नक्की करा..!!

#lifelessons #आयुष्य #fbviralpost2025シ #fbpost #viralpost2025 #ShareThisPost #followmeplease #followers #highlight
त्याने तिला विचारलं  Are you happy with me..m??

त्याने तिला विचारलं,
"Are you happy with me...?"

क्षणभरही न थांबता
तिने उत्तर दिलं "हो..."

पण त्या 'हो'च्या उत्तराने
त्याच्या हृदयात प्रश्नांची वावटळ पेटली.

कारण…
जवळ असूनही अंतर वाढतं,
हात हातात असले तरी ऊब हरवते,
डोळे भिडतात पण
भावनांना शब्दांची आस लागून राहते.

सोबत असतानाही
एकटेपणाची सावली का भासते?
स्पर्श असतो, मिठी असते,
पण मनामनांतल्या रिकाम्या जागा
भरल्या का जात नाहीत?

तिच्या उत्तरातलं "हो" खरं असलं,
तरी तिच्या नजरेतलं मौन
त्याला वेदना देत राहतं.

त्याच्या आत एक हळवी तगमग 
"आपलं प्रेम जिवंत आहे ना अजून?
की आपण फक्त एकत्र आहोत,
पण मनं हरवून बसलोय?"

प्रेम आहे, नक्कीच आहे,
पण त्या प्रेमाला
मोकळा श्वास घेण्यासाठी
संवादाची खिडकी उघडीच नाही.

आणि म्हणूनच...
तिच्या "हो" च्या मागे दडलेलं
ते न बोललेलं 'पण'
त्याच्या हृदयाला
रोज थोडं थोडं जखमी करत राहतं...
@ सोनाली कुलकर्णी 

#fbpost2025シ #त्याचीवेदना #प्रेम #नातं #संवाद #realationship #LifeLessons #followers #highlightseveryone
गोड बोलणारी लोक जास्त आपली का वाटतात??

हल्ली लोकांना "गोड बोलणारे" लोक जास्त आवडतात. कारण गोड बोलण्यात गोडवा आहे, आपुलकी आहे, समोरच्या माणसाला आनंद देणारा एक हलकासा स्पर्श आहे. 
पण "खरे बोलणारे" लोक बहुतेक वेळा टाळले जातात ,नको वाटतात. कारण खरं बोलणं म्हणजे सत्य मांडणं, आणि सत्य हे नेहमीच कडू असत .

गोड बोलणारे लोक आपल्याला हसवतात, वर वर का होईना कौतुक करतात, आपण जे करतो त्याला बिनधास्त पाठिंबा देतात. खूपदा त्यांच्यासोबत राहिलं की अहंकार सुखावतो, मनाला समाधान मिळतं. पण खरे बोलणारे लोक आरसा दाखवतात. आपल्यातल्या चुका, कमतरता, चुकीचे निर्णय हे ते स्पष्टपणे सांगतात. म्हणून त्यांचं बोलणं टोचतं, कडवट वाटतं,नकोस वाटत.

खरं म्हणजे प्रत्येकाला दोन्ही प्रकारचे लोक हवे असतात. गोड बोलणारे लोक आपल्याला आत्मविश्वास देतात, आणि खरे बोलणारे लोक आपल्याला घडवतात. पण दुर्दैवाने आज लोक "सत्य" स्वीकारायला तयार नाहीत. सत्याला भिडण्याची हिंमत कमी झाली आहे. म्हणूनच "गोड बोलणाऱ्यांची" गर्दी आयुष्यात जास्त करून घेतात, आणि मनापासून "खरे बोलणारे" एकटे पडतात.

मात्र आयुष्य खरंच बदलवणारे, प्रगतीच्या मार्गावर नेणारे हे गोड बोलणारे नसतात, तर खरे बोलणारेच असतात ,ज्यांना खरंच तुमच्या बद्दल काळजी असते ,त्यांना तुमचं खरंच चांगल झालेलं पाहायचं असत. तुम्ही चुकत असाल तर ते आपल्याला टोकतात , ते तुमच्याबाबतीत परखड मत व्यक्त करतात.वेळेअगोदर सावध करण्याचा प्रयत्न करतात.जरी ते शब्द कडू वाटले तरी आपल्याला सत्य दाखवतात, चुका लक्षात आणून देतात, योग्य मार्ग दाखवतात.

लोकांना बहुतेकदा आपल्या भावनांना सुखावणारे शब्द हवे असतात, म्हणून ते गोड बोलणाऱ्यांना जवळ करतात.
पण आपल्या चुका दाखवणारे सत्य मनाला टोचतं, म्हणून खरे बोलणाऱ्यांना दूर ठेवतात.
खरं तर गोड बोलणं तात्पुरता आनंद देतं,
आणि खरं बोलणं आयुष्य बदलून टाकतं.

म्हणूनच, ज्यांच्याकडून आपल्याला खरं बोलून ऐकावं लागतं, त्यांना दूर न ढकलता, त्यांचा सन्मान करायला शिकायला हवं. कारण खरे बोलणारे लोक हे आपल्याला हवे असतात जरी त्या क्षणी ते नकोसे वाटले तरीही आपले चुकते पाऊल सावरण्यासाठी...!!
@सोनाली कुलकर्णी 

#lifelessons #relationship #follwers #highlights #fbpost2025シ #अनुभवाचेबोल
गरज .....

जेव्हा तुम्ही कोणासाठी गरजेचे असता, तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत फक्त नुसती गरजेपोटी कधीच नसते. 
तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनता,
तुम्ही त्यांच्या आनंदात, दु:खात, यशात आणि अपयशात त्यांच्यासोबत कायम राहता . तुमचं अस्तित्व , तुमचं असणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण तुमचा त्यांना मानसिक आणि भावनिक आधार वाटतो. तुमच्यासोबत असताना त्यांना सुरक्षित वाटतं.

पण जर तुम्ही फक्त समोरच्याची एक गरज असाल, तर तुमचं अस्तित्व एका ठराविक हेतूसाठी किंवा फायद्यासाठीच असतं. 
तुमचा वापर फक्त तात्पुरत्या गरजेसाठी केला जातो आणि जेव्हा ती गरज पूर्ण होते, तेव्हा तुमची किंमत कमी होते. अशा नात्यात भावनिक हा भागच नसतो. हे नातं फक्त स्वार्थावर आधारित असत, जिथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा फक्त फायदा घेते.
अशा नात्यांमध्ये नेहमीच असुरक्षितता वाटू लागते आणि भावनांचाशून्य नात जाणवू लागत.

गरजेच असण आणि गरज असण या दोन्हीमधील फरक ओळखणं खरंच खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एका व्यक्तीसोबत फक्त गरज म्हणून जोडलेले असाल, तर ते नाते जास्त काळ टिकत नाही मग ते नाते कोणतेही असो . अशा नात्यांमध्ये तुम्हाला कधीच खरे प्रेम आणि आदर मिळत नाही. म्हणूनच, आपण आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या नात्यांना जास्त महत्त्व देतो , हे ठरवण्यासाठी हा फरक ओळखणं खरंच महत्त्वाचं आहे. खालील फोटोमधील हा qoute मला खरंच मनोमनी पटला..म्हणूनच...हे सारं लिहिण्याचा.. प्रयत्न...
@सोनाली कुलकर्णी 
#relationships #follower #fbpost2025シ #lifelessons #spandankavitaa


रिकामा बाकडा आणि तुझी आठवण...

कोसळणाऱ्या पावसात,
तो बाकडा अजूनही तसाच 
ओलसर, थेंबांनी भिजलेला,
पण तुझ्या स्पर्शाशिवाय कोरडा…

एकेकाळी
इथे बसायचो आपण,
हातात हात,
डोळ्यांत असंख्य स्वप्नांची गर्दी,
आणि मनात प्रेमाचा ओलावा साठवून...

आज मात्र
तो ओलावा फक्त पावसाचा आहे,
मनाचा नाही.
थेंब पडतात,
पण त्यात आपल हास्य मिसळत नाही.

पाऊस आणि मी 
दोघंही सारखेच वाटतो,
तू येशील या आशेने धावून येणारे,
पण अखेरीस
फक्त रिकाम्या आठवणी घेऊन परत जाणारे.

हा बाकडा
आता फक्त आठवण आहे
आपल्या हळव्या प्रेमाचा साक्षीदार,
जो आजही वाट पाहतोय,
तुझ्या परत येण्याची…
अगदी माझ्यासारखा....😌
@सोनाली कुलकर्णी

#आठवण #आठवणी #प्रेम #couplelove 
#fbpicturepost #fbpost2025シ #fbpost #मराठीकविता #follower #followme #followmeplease